संस्थेबद्दल माहिती

नवभारत शिक्षण मंडळ

एक वैचारिक क्रांती

"चांगल्याला चांगलं म्हणायची दानत आणि वाईटाला वाईट म्हणायची हिंमत जन-गण-मनात निर्माण झाल्याशिवाय अधिनायकाचा विजय होणार नाही."

— प्राचार्य डॉ. पी.बी.पाटील

हे नुसतं म्हणून ते थांबले नाहीत तर असा अधिनायक घडवण्याचा निश्चय त्यांनी केला आणि त्यातून उभे राहिले नवभारत शिक्षण मंडळ. १९५२ मध्ये अनौपचारिक रणशिंग फुंकल्या नवभारत शिक्षण मंडळाच्या कामाला १० फेब्रुवारी १९५८ रोजी कायदेशीर मान्यता व घटनात्मक स्वरूप मिळाले.

स्वातंत्र्य म्हणजे केवळ परकीय शासनाचा अस्त नाही तर प्रयत्नाला मोकळीक, सर्वांच्या सर्वांगीण विकासासाठी धडपड करण्याची संधी! याच भान ठेवत मानवतावादी मन, संशोधक बुध्दी आणि सत्याग्रही वृत्ती असणारा कणखर शरीराचा नागरिक घडवण्यासाठी जाणिवपुर्वक ‘नवभारत’ चा जन्म झाला आहे.

Shantiniketan Campus
संस्थेचे बोधवाक्य

सत्य

श्रम

प्रेम

महाराष्ट्रात शिक्षण संस्था कमी आहेत म्हणून या संस्थेची स्थापना करण्यात आलेली नाही तर चाकोरीबाह्य पण योग्य शिक्षण अमलात आणून नवभारताच्या उभारणीत एक ‘चांगला नागरिक’ निर्माण व्हावा हा उद्देश यामागे होता.

प्रेरणास्थान

आभाळाएवढी माणसे

या संस्थेच्या उभारणीत नवा विचार घेऊन अनेक महान व्यक्ती उभ्या होत्या. त्यांचं लाख मोलाचं मार्गदर्शन व सक्रिय सहकार्य संस्था उभारणीसाठी मिळाले.

आचार्य जावडेकर आचार्य भागवत यशवंतरावजी चव्हाण डॉ. जे. पी. नाईक ले. ज. एस. पी. पी. थोरात पद्मभूषण वसंतदादा पाटील गुलाबराव पाटील बाळासाहेब खर्डेकर बाबूरावजी जगताप भाऊसाहेब खराडे दीनानाथ भोसले आण्णासाहेब कराळे बाजीराव बाळाजी पाटील विठ्ठलराव देशमुख एम. आर. देसाई नागनाथअण्णा नायकवडी टी. के. पाटील

पुढील काळात लाभलेले बहुमोल मार्गदर्शन:

अ‍ॅड. एस. बी. पाटील हिंदकेसरी कै. मारुती माने रावसाहेब पाटील रमणभाई शहा शिवाजीराव पवार सनतकुमार आरवाडे तानाजीराव कोरे आप्पासाहेब (सा.रे.) पाटील डॉ. एस. आर. पाटील आर. आर. पाटील (आबा)

ग्लोबल संस्था, मातीशी नाळ

या साऱ्या मान्यवरांच्या मार्गदर्शनानं आज इतक्या वर्षांनी शांतिनिकेतनचं रूप आणि स्वरूप, चारी अंगांनी प्रचंड बदललं आहे. संस्था ग्लोबल झाली आहे, पण तरीही बहुजन कष्टकरी जनतेशी असलेली नाळ मात्र कायमची जोडली गेली आहे.

प्राचार्य डॉ.पी.बी.पाटील यांच्या कल्पनेतील ‘नवभारत’ घडविण्याचं काम सरोजताई पाटील (माई) यांनी केलं. त्यांच्यानंतर आता ही संस्था सर्वार्थानं समर्थ आणि संस्कारक्षम केली ती संचालक श्री. गौतम पाटील यांनी.

कला आणि क्रीडा

दर्जेदार शिक्षणासोबत दर्जेदार कला आणि क्रीडा यांचं प्रशिक्षण देणारी ही एकमेव संस्था.

नाविन्यपूर्ण उपक्रम

कल्पनेच्या पलिकडील अनेक उपक्रम श्री. गौतम पाटील यांच्या संकल्पनेतून साकार होत आहेत.

"शिक्षण संस्था कशी असावी? हे पहायचं असेल तर शांतिनिकेतनला भेट द्यावी असं देशभरातील जाणकार म्हणतात ते यासाठीच!"